पंधरा वर्षे प्रलंबित असलेले वारस नोंदीचे काम करण्याचे पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
गेली पंधरा वर्षे वारस नोंदी करता प्रशासनाच्या बे जबाबदार कारभारामुळे विलंब झाल्याने वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ येथील रहिवासी अंजनी अर्जुन गोडकर व मुलगा शैलेश गोडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले पंधरावे उपोषण 26 जानेवारी रोजी करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला होता मात्र पालकमंत्री नितेश राणे यांनी या उपोषणकर्त्यांना याबाबत निश्चितपणे न्याय देण्याचा शब्द दिल्याने त्यांनी आपले उपोषण आज स्थगित केले आहे.
तसेच गेली पंधरा वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत
Post a Comment
0 Comments